असतेच का असेही फसवेच दान हाती
मिळूनि न लाभण्याचा हा वज्रलेख माथी

गणती सदा सुखाची भरूनीच वाहणाऱ्या
 अश्रूंस का विचारी??वाहून सम्पलेल्या...

आभास सोबतीचा,की धरता विरून जाई
ना सूर्य ना चंद्रछाया संधीप्रकाश राही,,

जरी  वाट ही ,,नसावी तुझ्या चालण्याची..
 पण वेळ हीच आहे , खूणगाठ बांधण्याची

अस्वस्थता जीवाला ,कवडसे सुखाला
सवे असणार आहे ,, समजूत ही मनाला...

आरती जोशी-ऋचा प्रभुणे.

Comments

Popular posts from this blog

अन्नपूर्णेचा घास

फुगे

मेतकूट