स्मरणी
स्मरणी म्हणे नाम घेतले,जे मणी स्पर्शोन पुढे गेले ।
विसर्जो म्हणू अधिक झाले"मी"पण, नाम न स्पर्शिल्याने।।
आरंभ-अंताचे व्यवधान,आवर्तनांचीही ठेविता जाण ।
तरी,मग कैसे हरवेल भान, व्यवहारे सर्व व्यापता असे ।।
ज्याचे स्वरूप न ये मापता,ऐसा चिदानंद शोधो जाता । संचयाची कास नको आता, अमेय तीच अनुभूती जाण ।।
स्मरणीइतुके मूक नाही,नाही स्मरणीसम बोलके काही ।
आत्मसुखाची हीच ग्वाही,अंतःकरण "नाम" जपो आता।।
आरती जोशी-ऋचा प्रभुणे
Comments
Post a Comment